पाठलाग (मराठी भयकथा) भाग ९
पाठलाग (मराठी भयकथा) भाग ९ आकाशला जिवंत बघून जयेश आणि चंदू जरी खुश झाले पण त्याला वाचविणं तितकंच अवघड होतं. आजू बाजूला रात्रीचा काळकभिन्न अंधार होता,त्यात त्या महालाच्या काळ्या पाषाणातल्या उंच उंच पण छत नसलेल्या दगडी भिंती अजस्त्र राक्षसांसारख्या भासत होत्या. या भिंतीच्या भुलभुलैय्या मध्ये खूप आतवर ते धन असलेलं दालन होतं आणि तिथेच सगळे जमून आता आज शेवटचा प्रयोग करणार होते आणि हे नाट्य संपणार होतं. नियतीचा खेळ कसला अजीब होता गेल्या दशकात जे साधू आणि वसंत मिळून करू शकले नाहीत ते वसंताच्या मुलांनी आणि जावयाने काही महिन्यातच करून दाखवलं. आज त्यांनी उरलेले सात जण जमवले होते आणि योजनाबद्ध रित्या धन नेण्यासाठी मोठं वाहन लागेल म्हणून बस सुद्धा घेऊन आले होते. साधू खूप आनंदित होता त्याच्या प्रमाणेच वसंत आणि त्याचा परिवार सुद्धा आनंदी होता कारण आजपासून त्यांचं नशीब बदलणार होतं. अंधारात अक्षय आणि मोन्या ने मशाली पेटवल्या आणि तिथे धगधगता उजेड झाला. तिथे आधी येऊन साधूने पिशचांना आधीच जागृत केलेलं होतं त्यामुळे आत पुढचे सोपस्कार पार पडायचे होते. वसंत आणि साधूने आकाशला एक कोपऱ्यातून बाहेर