पाठलाग (मराठी भयकथा) भाग ५
पाठलाग (मराठी भयकथा) भाग ५ जयेश आणि चंदू ला वाटलं कि आपण केतन ला आणि त्याच्या मित्रांना आपल्याच गावात पकडलं पण ती मुलं वेगळीच निघाली. काय होतंय ? काय घडतंय ? जे दिसतं ते खरं कि जे आपण अनुभवलं ते खरं ? या विचारात जयेश आणि चंदू दोघेही हरवले होते. ते दिगुनानाच्या आवाजाने भानावर आले. "आरं पोरांनो जेवून घ्या तुम्हीपण आज हिथच ह्ये पोरं आज शेतात न्हाय जाणार ते रातच्यालाच शहराला चाललेत मग मित्र-मित्र तुमि सोबतच जेवा आता " "नाही नको नाना आई ने स्वयंपाक बनवून ठेवला असेल ती पण वाट बघत असेल" जयेश बोलला . "आर असू दे कि मग काय झालं " दिगुनाना. "बरं थांबा मी आईला फोन करून सांगतो" जयेश ने मोबाइलला वरून दोन गल्ल्या पलीकडे असलेल्या स्वतःच्या घरी आई ला फोन लावला. तो पर्यंत चंदू त्या मुलांशी गप्पा मारायला लागला होता कारण त्याला जयेशच्या डोक्यात काय चाललं आहे ते कळलं होतं नाहीतर जयेश उगाच इतक्या लवकर जेवायला तयार नसता झाला. एकमेकांना इतके चांगले ओळखत होते म्हणून तर ते इतके चांगले मित्र झाले होते. चंदू त्या मुलांची माहिती काढू लागला. तोपर्यंत जयेशचा फोनदेखी...